वॉशिंग्टन: आगामी दोन वर्षाच्या कालावधीत जगाच्या कानाकोपऱ्यात करोना लास पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य असले तरी केव्हा वाळूच्या टंचाईमुळे लसीच्या उत्पादनाला ब्रेक लागण्याचा धोका आहे.
करोना सारख्या लसी निर्माण दत्या ज्या काचेच्या बाटल्यांमधून वितरित केल्या जातात त्या बाटल्या निर्माण करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या वाळूची गरज असते पण अशा वाळूची आता टंचाई जाणवू लागल्याने त्याचा फटका लसीच्या उत्पादनावर होणार आहे आगामी २ वर्षांच्या काळात जगाला अशा प्रकारच्या २०० कोटी बाटल्यांची गरज भासणार आहे, पण एवढ्या बाटल्या उत्पादित होतील एवढी वाळू उपलब्ध आहे कि नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे जरी लस निर्माण झाली तरी त्याचा पुरवठा करण्यावर मर्यादा येणार आहेत.
संयुक्त राष्ट्र एन्वायरनमेंट प्रोग्रामशी संबंधित हवामान तद्न्य पास्कल पेडूजी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जगाच्या काहीच भागात वाळूची अशी टंचाई जाणवेल सर्वत्रच फटका बसेल असे नाही पण आगामी १० वर्षे वाळूच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली संयुक्त राष्ट्र एन्वायरनमेंट प्रोग्रामने दिलेल्या माहितीप्रमाणे दरवर्षी ५० अब्ज मेट्रिक टन वाळू फक्त बांधकाम क्षेत्रात वापरली जाते.
गेल्या २० वर्षात त्यामध्ये ३०० टक्के वाढ झाली आहे परत तेवढीच वाळू निर्माण होण्यास २ ते ३ वर्षांचा काळ लागू शकतो वाळूचा वापर मर्यादित व्हावा म्हणून आता राख,कचरा ,प्लास्टिक यांचा वापर करण्यावर भर दिला जावा असे सुचवण्यात आले आहे.