मुंबई: महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे प्रश्न समोर ठेवून आम्हाला काम करायचे आहे. त्यामुळे आघाडीचे शिवसेना पक्षासोबत मतैक्य झाले पाहिजे. घाई करून घोटाळा करण्यात काही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष पूर्ण विचार करून एकत्र येणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच सत्तास्थापन करण्यासाठी या तीनही पक्षांकडून कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवला पाहिजे. ज्यायोगे पाच वर्षे राज्यातील जनतेसाठी स्थिर सरकार देता येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.