कोलकता – महाराष्ट्रातील शिंदे सरकार अनैतिक आणि लोकशाहीविरोधी आहे. जनतेची मनं जिंकू न शकणारे ते सरकार लवकरच कोसळेल, असे भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले. एका टीव्ही वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ममतांनी महाराष्ट्रातील घडामोडींवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रात सत्ताबदल घडवण्यासाठी भाजपने धनशक्ती, मनगटशक्ती आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला. शिवसेनेतील बंडखोर आमदारांना आसामला नेण्यात आले. त्यांना केवळ पैसाच नव्हे; तर इतरही अनेक गोष्टी पुरवण्यात आल्या. पण, त्याचा तपशील मी देणार नाही.
पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारण्यासाठी जनता मतदान करेल. भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल. पुढील निवडणुकीत जनता विरूद्ध भाजप अशी लढत होईल, असा दावाही त्यांनी केला.