दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या होणार 39 जाहीर सभा
मुंबई : राज्यातील पुरपरिस्थिती पुर्ववत होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. येत्या 21 ऑगस्टपासून ही यात्रा सुरू होवून 31 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू होणार राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कालावधीज 1,839 किमीचा प्रवास या यात्रेत पुर्ण करण्यात येणार आहे. नंदूरबारपासून सुरू होणाऱ्या यात्रेचा शेवट 31 ऑगस्टला सोलापूरात होणार आहे.
राज्यात आलेल्या पुरामुळे मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा 5 दिवस उशिराने नंदुरबारमधून सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान, 14 जिल्हे आणि 55 मतदारसंघ आहेत तर यात 39 जाहीर सभा आणि 50 स्वागत सभा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा हा गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणार असल्याचे भाजप नेते आणि महाजनादेश यात्रेचे प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.