‘मएसो’च्या विमलाबाई गरवारे प्रशालेत यशस्वी उपक्रम
आंबेगाव बुद्रुक – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म्हणजेच सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने सुरू केलेल्या मराठी माध्यमाच्या शाळेतील पहिल्या आणि एकमेव रेडिओ केंद्राचे उद्घाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात झाले.
विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विज्ञान भारतीचे सदस्य सुबोध वाणीचे निर्मितीकार विलास रबडे यांनी मित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून मित्र सुबोधचे नाव रेडिओ केंद्राला दिले. स्वतःचे रेडिओ केंद्र सुरू करणारी सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ही देशातील एकमेव शाळा ठरली आहे. याप्रसंगी प्रशालेचे 1970च्या बॅचचे माजी विद्यार्थी यांनी डिजिटल क्लासरूम भेट दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, कार्यक्रमाचे पाहुणे विश्वास काळे, विलास रबडे, विज्ञान भारतीचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी, प्रशालेच्या शाळा समिती सदस्य 1970च्या बॅचचे माजी विद्यार्थी देवदत्त भिशीकर, विज्ञान भारतीचे सदस्य रमेश हाते, श्रीकांत कुलकर्णी, श्रीमती नीला पुरोहित प्रशालेच्या शाळा समिती अध्यक्षा आनंदी पाटील. प्रशालेचे महामात्र सुधीर गाडे, अरविंद गायकवाड आणि श्रीधर करकरे पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुबोध वाणी या रेडिओ केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे महापात्र सुधीर गाडे यांनी केले. ते म्हणाले की, या संधीमुळे कल्पक, सृजनशील असे विद्यार्थी-विद्यार्थिनी घडविण्यासाठी याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांनाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक नवे दालन या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी म्हणाले की, सुबोधवाणीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल आणि विज्ञानाचा प्रसार देखील होऊ शकेल. शाळा समितीच्या अध्यक्षा आनंदी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. विश्वास काळे यांनी कमोडर सुबोध पुरोहित यांचा जीवन परिचय सांगितला.
विलास रबडे यांनी सुबोध पुरोहित यांच्या आठवणी सांगितल्या. आम्ही या प्रशालेचे विद्यार्थी म्हणून शाळेला काही देणे लागतो. या भावनेतून सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. श्रीपाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रेडीओ कसा सुरु करावा, या मागदर्शनातून य उपक्रमास मुर्तरूप मिळाले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण गोखले यांनी, सुबोध वाणी रेडिओ केंद्रामुळे विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्तेची दालने खुली होतील असे सांगितले. सूत्रसंचालन अर्चना लडकत व विद्या गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापक रामदास अभंग यांनी आभार मानले.