वेल्हे -राजगड किल्ल्यावर होणारा रोप-वे हा सर्वांच्या मतानुसार होईल. यात विरोधकांशी चर्चा करून मगच रोप-वेचे काम सुरू करू, असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
तालुक्यात सध्या राजगडावर होणारा रोप-वे हा विषय फारच चर्चेला आला आहे याविषयी आमदारांनी चर्चा केली.
सध्या तालुक्यात रायगड रोप-वेची चर्चा चालू असताना अनेकांनी रोप-वे नको अशी सांगून या विषयाला वेगळे वळण दिले आहे. राप-वे झाला तर किल्ल्यावरील अनुचित प्रकारात वाढ होईल,
किल्ल्याचे महत्त्व कमी होईल, बाजारी स्वरूप येईल अशी अनेक मतमतांतरे चर्चेत आलेली आहेत. मात्र, या चर्चेला काहीच अर्थ नसून रोप-वेसाठी अजून बरेच दिवस बाकी आहेत. याबाबत कोणी चर्चा करू नये, असेही मत तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.
याबाबत तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. ते पुढे म्हणाले, रोप-वेच्या निमित्ताने किल्ल्याचा पर्यायाने या भागाचा विकास व्हावा, पर्यटनास चालना मिळावी, पर्यटन वाढले की रस्ते मजबूत करता येतील, हाच उद्देश आहे.
एकूणच या भागातल्या लोकांचे उत्पन्न वाढेल अशा दृष्टीने रोप-वे ची मागणी केली होती. आता तोरणा आणि रायरेश्वर या दोन किल्ल्यांसाठीसुद्धा रोप-वेची मागणी करण्यात आलेली आहे.
रोप-वे संदर्भात नुकतीच एक घोषणा झालेली आहे; परंतु रोप-वे झाला तर तालुक्याचा विकासच होईल, असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.