मुंबई – भारतरत्न देण्याच्या मागणीवरून महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेची भूमिका ही आमची भूमिका नाही असे वक्तव्य केले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
नाना पटोले म्हणाले कि, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारची समस्या नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
Bharat Ratna should be conferred upon Savitribai Phule and Shahuji Maharaj. Shiv Sena’s stand is not our stand: Maharashtra Congress Chief Nana Patole on Shiv Sena’s demand for Bharat Ratna to Vinayak Damodar Savarkar pic.twitter.com/jYGO6w94dK
— ANI (@ANI) March 5, 2021
दरम्यान, याआधी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात, भारतरत्न नाही मिळाला तरी चालेल पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. तुमचं सरकार तयार झाल्यानंतर त्यांनी पुस्तक काढले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री, आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले हे मोठं आश्चर्य आहे. संभाजीनगरच्या संदर्भात तर अतिशय हास्यास्पद अशाप्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे, असे म्हणत शिवसेनेवर तोफ डागली होती.
तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये. सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे. वीर सावरकरांबद्दल शिवसेनेने कधीही आपली भूमिका बदलली नाही, असेही त्यांनी म्हंटले होते.