आरएएफच्या स्थापना दिवसानिमीत्त अमित शहांचे वक्तव्य
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील रॅपिड टास्क फोर्सच्या (आरएएफ) 27 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. अहमदाबादमध्ये पोहचल्यानंतर शहा यांनी परेडचे निरक्षण केले. तसेच आरएएफमुळे देशातील दंगलींना चाप बसला असल्याचे महटले. शहा यांनी यावेळी परेडचे अभिवादन स्विकारले.
आरएएफची स्थापना 1992 मध्ये आजच्या दिवशी झाली होती. इतक्या कमी वेळातच आरएएफने देश आणि जागतिक पातळीवर आपली विश्वासार्हता निर्माण करण्यात मोठे यश संपादन केले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले. तसेच बऱ्याच ठिकाणी आरएएफच्या अस्तित्वामुळे दंगलींना चांगलाच चाप बसला असल्याचेही अमित शहा म्हणाले. गृहमंत्र्यांनी यावेळी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईत शौर्य दाखविणाऱ्या सीआरपीएफ जवानांना आणि विविध राज्यांमध्ये नक्षलवाद्यांविरूद्धच्या कारवाईत शौर्य पदके देवून त्यांचा सन्मान केला. या निमलष्करी दलाने दंगल विरोधी आणि जमावावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले आहे.