मुंबई : राज्यात शनिवारी(दि. 14 नोव्हेंबर) 2 हजार 700 काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 16 लाख 12 हजार 314 झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.41% एवढे झाले आहे.
शनिवारी राज्यात 4 हजार 237नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 44 हजार 698 झाली आहे.
राज्यात शनिवारी 105 काेरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे. राज्यात आज (शनिवार दि.14 नोव्हेंबर) रोजी एकूण 85 हजार 503 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.