मुंबई – राज्यात दिवसभरात आणखीन 11,852 रुग्णांची भर पडली असून सुमारे 11 हजार 158 नागरिकांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 5,73,559 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 72.37 % एवढे झाले आहे.
आज राज्यात 11,852 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले तर राज्यात आज 184 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.1% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 41,38,929 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 7,92,541 (19.14 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 13,55,330 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 35,722 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.