Ajit Pawar महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना आज (28 जानेवारी) अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या पाच जणांचा देखील मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या अचानक निधनाने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनाने त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरचं राहिले… गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी, अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची त्यांची मनापासून इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, त्यांना अद्याप मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही, परंतु भविष्यात हे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असं विधान हे त्यांनी त्यावेळी हे विधान केले. सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून केलं काम अजित पवार यांनी २०१० पासून आतापर्यंत सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. परंतु मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती. त्यांनी या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पोस्टर आणि बॅनरही लावले होते. काय म्हणाले होते अजित पवार? महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वैभवशाली महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “१ मे रोजी जागतिक कामगार दिन हा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णयही आम्ही घेतला. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असे राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं, पण शेवटी योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावंस पण कुठं जमतंय. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असं नाही,” असे शब्दांत अजित पवार यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या. Ajit Pawar २०१० मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार राजकारण शिकले. २०१० मध्ये पहिल्यांदा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण हे तेव्हा मुख्यमंत्री होते. २५ सप्टेंबर २०१२ पर्यंत ते तेव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर, २५ ऑक्टोबर २०१२ ते २६ सप्टेंबर २०१४ तेव्हाही पृथ्वीराज चव्हाण यांच्या पदाखाली त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी पुन्हा या पदाची शपथ घेतली. परंतु, हे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं. हे सरकार कोसळल्यानंतर लगेच ३० नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ पर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत होते. मात्र जवळपास सहावेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न मात्र अधुरचं राहिलं… हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash : हेलिकॉप्टर ढगात शिरलं अन्..; लोकांनी काढली अजित पवारांच्या ‘त्या’ घटनेची आठवण