नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती असून सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण तसेच रेल्वेमध्ये कोणत्या सुधारणा करता येतील, यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेला गती देण्यसासोबतच सुरक्षित प्रवासासाठी सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. प्रवाशांना केंद्रबिंदू ठेवून रेल्वे सेवा अद्ययावत केली आहे.
Safety First: First time in 166 years, Indian Railways had zero passenger deaths in the current financial year.https://t.co/9tgqKSo9js
— Piyush Goyal (@PiyushGoyal) December 25, 2019
वंदेभारत एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस सारख्या रेल्वे प्रवाशांसाठी सज्ज आहेत. यातच रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वेबाबत माहिती दिली आहे. पीयुष गोयल यांनी ट्विट केले आहे की,’१६६ वर्षात असे पहिल्यादांच घडले आहे की,’ भारतीय रेल्वेच्या वर्तमान काळात एकही प्रवाशांचा मृत्यू झालेला नाही. रेल्वे सेवेच्या एकीकृत कारणामुळे रेल्वे सेवा तसेच सुविधा, कार्यशैली आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा होईल.’