नवी दिल्ली – सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील नियोजित कार्यक्रम सोडून नवी दिल्लीला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागावले आहे.
पंतप्रधानांच्या नियोजित मार्गावर निदर्शने सुरू झाल्याने उड्डाण पुलावर मोदी यांना सुमारे 15 मिनिट अडकून पडावे लागले. असे असतानाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंजाब सरकारवर टीका केली.
पंजाबमध्ये जे काही घडले ते गोंधळ आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या सरकारने या प्रकरणासाठी देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे, या घटनाक्रमाबद्दल पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी पंजाब सरकारवर निशाणा साधला.