सातारा – विरोधक म्हणतात मला काही काम नाही पण तुम्ही मागील 10 वर्षांत काय दिवे लावले ते जनतेने पाहिले आहे. मी जनतेच्या सुखदुःखात कायम त्यांच्या सोबत असतो म्हणूनच जनता माझ्या सोबत असते, अशी चपराक आ. मकरंद पाटील यांनी मदन भोसले यांना लगावली.
वाई शहरातील गंगापुरी आणि धर्मपुरी या ठिकाणी झालेल्या सभेत मकरंद पाटील बोलत होते. याप्रसंगी शधिकांत पिसाळ, नगरसेवक शीतल शिंदे, प्रदीप दादा चोरगे, अनिल सावंत उपनगराध्यक्ष, नगरसेवक दीपक ओसवाल, चरण गायकवाड, धनंजय हागिर, राजेश गुरव, तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, भारत खामकर, बाळासाहेब बागुल, हिराशेठ जैन, राकेश ओसवाल, दीपक हजारे, प्रतीक जैन, रमेश शेठ ओसवाल, सुनील बनकर, माऊली इंगळे, भाऊ कोकीळ, भाऊ वीर, स्मिता बनकर, कांतीलाल शेठ, हिरा शेठ, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, प्रतापराव पवार, दिलीप पिसाळ, माजी नगरसेविका पद्मा पिसाळ, रमेश गायकवाड. बापूसाहेब जमदाडे, दादासाहेब पवार, दत्तात्रय रांजणे, अशोकराव सरकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. मकरंद पाटील म्हणाले, जे जे प्रश्न आपल्या मतदार संघामध्ये होते ते प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. नागेवाडीच्या कॅनॉलची कामे पूर्ण झाली, पोटपाटांची कामे झाली, त्यामुळे साडेपाच हजार क्षेत्र पाण्याखाली आले. बोपर्डी लोहारेचा साडे बारा कोटींचा एमआय टॅंक मंजूर करण्यात आला. तहसीलदार कार्यालय, कृषी विभाग, सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय कार्यालय, सगळ्या स्मशानभूमीचे प्रश्न, सुसज्ज स्मशान भूमी घाट सुशोभीकरण, पुण्यामुंबई पेक्षा चांगल्या दर्जाचे स्विमिंग पूल अशी असंख्य विकासकामे पूर्ण झाली आहेत.
जिथे शिवरायांनी इतिहास घडवला त्या आपल्या वाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता म्हणून भव्य आणि आकर्षक असे महाराजांचे स्मारक लवकरात लवकर झालेले पाहायला मिळेल.विरोधक लोकांना सांगतायत आमदारांनी काय केले. 2004 ला ते निवडून आले तेव्हा त्यांनी काय केले? असा सवाल करत मकरंद पाटील म्हणाले, तुम्ही कर्तबगार असता तर जनतेने पाच वर्षात तुम्हाला घरपोहोच केले नसते.
ती कारखान्याच ओझ तुम्ही घेतले तर काय केले? 850 कोटी कर्ज निर्माण केले, 12 महिने कामगारांना पगार नाही. उपपदार्थांच्या निर्मितीतून येणारा पैसे गेले कुठे? काय करायचं शेतकऱ्यांनी, कामगारांनी? इतक्या वाईट पद्धतीने करखाना चालवलाय आणि म्हणे मी गाडून घेतलं होतं. तुमची कर्तबगारी शुन्य असल्यानेच जनतेने तुम्हाला वेळोवेळी नाकाराले आहे मदन भोसलेंनी लक्षात ठेवावे. यावेळी दीपक ओसवाल, बावधनचे युवा नेते भैय्यासाहेब पिसाळ यांचीही भाषणे झाले. याप्रसंगी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.