पवनानगर – मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे व तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी शनिवारी (दि. 2) आंदर मावळातील भोयरे, कशाळ, माळेगाव खुर्द व बुद्रुक, बोरीवली, वहानगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पवन मावळमधील वारू, करुंज, बेडसे, येळसे, काले कॉलनी या गावतील पिकांची पाहणी केली. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता पिकांचे पंचनामे लवकरात लवकर करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या वेळी उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ क्षेत्रिय कर्मचारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरीत पंचनामे करावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.