मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात 0.50% ची वाढ केली असली तरी चालू आर्थिक वर्षांमध्ये महागाइचा दर 6.7% राहण्याची शक्यता रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्यक्त करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने महागाई 4% च्या आत रोखण्याचा संकल्प केला असतांना गेल्या अनेक महिन्यापासून महागाइचा दर या पातळीपेक्षा कितीतरी जास्त आहे.
रिझर्व्ह बॅंकेने महागाइचा दर 6.7% राहण्याची शक्यता व्यक्त करून व्याजदरात वाढ केली होती. मे महिन्यातही व्याजदरात वाढ करून मागायचा दर 5.7 टक्के राहील असे म्हटले होते. मात्र त्यानंतर जागतिक परिस्थिती बिघडली आणि भारतातील महागाईचा दर वाढत गेला.
करोनाच्या काळात नागरिकांना मदत व्हावी म्हणून रिझर्व्ह बॅंकांनी भांडवल सुलभता निर्माण केली होती. त्यामुळे बाजारातील खेळता पैसा वाढला होता. त्यातच रशिया – युक्रेन युद्ध झाल्यानंतर जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारताला आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत महागाई वाढत असल्याचे दिसून येत आहे.
खरिपाची पोर पेरणी वेगाने पूर्ण होत आले आहे. त्यामुळे भारतातील महागाईचा दर आगामी काळात कमी होईल अशी आशा रिझर्व्ह बॅंकेने धोरण जाहीर करताना व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत ध्यास यांनी सांगितले की, दुसऱ्या आणि दुसऱ्या तिमाहीत महागाईचा दर 6 टक्के पेक्षा जास्त राहणे अपेक्षित आहे.
त्याचबरोबर गेल्या 15 दिवसात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर पेक्षा कमी आहेत. ही भारताच्या दृष्टीकोनातून समाधानाची बाब आहे. जर कच्च्या तेलाचे दर कमी झाले तर भारतातील महागाई कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर भारतातील रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास मदत होईल असे दास यांनी सांगितले.