पुणे – खडकवासला भागातील बाहुली गावातील भगवतवाडी येथे आगीत घरे जळालेल्या 20 शेतकरी कुटुंबियांना दि पुना मर्चंट्स चेंबरतर्फे एक महिना पुरेल एवढ्या अन्नधान्याच्या वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे.
त्यावेळी चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, बाजार समितीचे उपसचिव सतिश कोंडे, भुसार विभाग प्रमुख नितीन रासकर, चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा आणि राजेंद्र शिंगवी उपस्थित होते.
सरपंच बंडू भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मदत देण्यात आलेली आहे. भगवतवाडी येथील 14 मार्च रोजी लागलेल्या आगीत 20 शेतकऱ्यांची घरे जळाली होती. त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर चेंबरने ही मदत केली आहे.