औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये देखील करोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर काही जिल्ह्यांमध्ये करोना संबंधीचे निर्बंध कडक करण्यात आलेत.
अशातच आता औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात करोनारुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील विदारक चित्र मांडत आघाडी सरकावर ताशेरे ओढले आहे. या फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं टा फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील तसेच कोरानाच्या संकटा मधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती….@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11 pic.twitter.com/QKRVXEuK33
— MLA Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) March 24, 2021
श्वेता महाले यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले… “सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील तसेच कोरानाच्या संकटा मधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती…’ या आशयाचे ट्विट महाले यांनी केलं आहे.