वाल्हे-श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहुन आळंदीकडे मार्गस्थ झालेल्या श्री पांडूरंग पालखी सोहळा आज वाल्हे (ता. पुरंदर) येथे विसावला.
सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर नीरा नदीवरील दत्तघाटावर पांडुरंगाच्या पादुकांना पवित्र स्नान घालून, दुपारची विश्रांती घेऊन, पालखी सोहळा महर्षि वाल्मिकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावरती सायंकाळी विसावला. सुकलवाडी (ता. पुरंदर) फाट्यावरील पालखी तळावरती वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत केले. टाळ मृदंगाचा गजर ज्ञानदेव तुकारामांच्या जयजयकाराने संपूर्ण पालखीतळ भक्तिमय झाला होता. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितिमध्ये आरती झाली.
यावेळी वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल खवले, जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, माजी सरपंच दत्तात्रय पवार, माजी तंटामुक्ति अध्यक्ष सत्यवान सुर्यवंशी, आडाचीवाडी सरपंच दत्तात्रय पवार, सुकलवाडीचे उपसरपंच धनंजय पवार, वाल्हे ग्रामपंचायतीचे सदस्य हनुमंत पवार, सुरेखा भुजबळ, सुनिता भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, तलाठी निलेश पाटील, आनंद पवार, तानाजी भुजबळ, सुनिल पवार, जयवंत भुजबळ, उपस्थित होते.
यावेळी, पांडुरंग पालखी सोहळा अधिपती विठ्ठल तात्यासाहेब वासकर, ऋषिकेश वासकर, नामदेव वासकर, मयुर ननावरे, एकनाथ वासकर, प्रभुराज वासकर, गोपाळ वासकर, गोपाळ देशमुख आदिंचा वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळावर स्वच्छता, लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर जेजुरी पोलिसांच्या वतीने, समीर हिरगुडे, पोलिस हवालदार जगदाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.