– अतिश बारणे (पाटील)
शहराचा सर्वांगिण विकास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर अल्पावधीत पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पक्षाने अतिशय महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. इतर कोणत्याही पक्षांना जे जमले नाही ते अजितदादा पवार यांनी करून दाखवले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहराची गरज ओळखून विकासकामे करत असताना गुणवत्ता, दर्जा आणि पारदर्शकतेला अजितदादांनी प्राधान्य दिले. पिंपरी-चिंचवडकरांनी टाकलेला विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सार्थक ठरविला आहे.
शहरात केवळ मोठी विकासकामे नव्हे, तर तळागाळातील गोरगरीब गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांचे कल्याण करण्याचा, त्यांचे हित जपण्याचा प्रयत्न अजितदादा पवार यांनी केला.
महाराष्ट्राच्या राजकरणातले तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेले अजितदादा पवार, राज्याच्या विकासाची आस असलेल्या सर्वांचे दैवत अजितदादा, व्यक्तिमत्त्व वादळी असले, तरी हे वादळ नुकसान करणार नाही, उलट वाऱ्याच्या वेगाने सर्वांना पुढे घेऊन जाईल, हा विश्वास आहे. दादागिरी ही विकासाच्या क्षेत्रातील असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक माणूस या झंझावताचा सकाळी 7 पासून रात्री उशिरापर्यंत अनुभव घेत आहेत. प्रशासनावरील पकड, विषयाची जाण, तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता हे सर्व गुण आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप आपण अनुभवत आहोत.
जिद्दी, करारी, गोरगरिबांप्रती प्रचंड तळमळ, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला वाहून घेण्याची
धडपड, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेण्याची वृत्ती. शेतकऱ्यांच्या जीवनात खुशी निर्माण व्हावी म्हणून जीव झोकून देत काम करण्याची दानत या गुणांमुळेच अजितदादा पवार हे आज राज्याच्या पटलावर ताऱ्यासारखे चमकत आहेत. प्रसिद्धीच्या मागे न लागता केवळ कर्तबगारीच्या जोरावर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येते हे दादांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. दीनदुबर्ल, रंजले गांजले, पीडितांचे, बापड्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दादा निष्ठेने, तळमळीने अन् जिद्दीने काम करतात. म्हणूनच आज दादा म्हणजे विश्वासार्हता हे दूर्मिळ समीकरण आजच्या काळातही रूढ आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अख्खा महाराष्ट्र ज्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतोय ते अजितदादा पवार म्हणजेच आमचे अजितदादा यांचा आज वाढदिवस आहे. झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव आज भल्याभल्यांमध्ये आहे. एकमेव दादा मात्र त्याला अपवाद आहेत. “हा सूर्य अन् हा जयद्रथ’ या रोखठोक कार्यशैलीमुळे प्रशासनात तर दादाविषयी आदरयुक्त जरब आहे. आपल्या विलक्षण निर्णयक्षमतेच्या जोरावर दादांकडे गेले की काम मार्गी लागलेच म्हणून समजा, हा सर्वसामान्यांच्या मनात दादांनी विश्वास निर्माण केला. दादा कागदांच्या फाईलींकडे पाहत नाहीत. गाव केंद्रबिंदू मानून तेथील रंजल्या-गांजलेल्यांची परिस्थिती पाहून तातडीने लोकाभिमुख निर्णय घेतात; हा त्यांचा गुण सामान्यांना इतका भावतो की नेता असावा तर दादांसारखाच! अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस जावे, बापड्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना जीवनात असलेल्या दु:ख आणि संकटाची कायमचीच फारकत व्हावी, यासाठी कोणत्याही अडथळ्यांची तमा न करता दादांची सतत घौडदौड सुरुच असते. या गुणांमुळे तर दादांची दादागिरी सर्वांनाच भावते. निष्कलंक आणि सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्याची दादांची दुर्दम्य इच्छाशक्ती लोकांना इतकी भावली आहे की, रोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक दादांकडे आपल्या भागातील विकासाची कामे घेऊन येतात. त्यामुळेच आज सर्वाधिक गर्दी दादांकडे पाहायला मिळते.
कायदा लोकांच्या भल्यासाठी असतो, विकासासाठी तो वापरा, असे दादा प्रशासनाला सतत बजावत असल्याने दादांच्या मनातील सर्वसामान्यांविषयीच्या असलेल्या कळकळीचे दर्शन होते. आज दादांकडे सत्ता नाही तरीही सर्वसामान्यांचे काम अडले की ते दादांकडेच धाव घेतात. दादांच्या या जगावेगळ्या गुणांमुळे त्यांना राज्यातील सर्वांत मोठ्या पडद्यावर आरुढ झालेले बघण्याची राज्यातील लाखो जणांना आता घाई झाली आहे. वाढदिवसानिमित्त या दूरदर्शी, कणखर आणि जनराजाला लाख-लाख शुभेच्छा. अजितदादा, तुम्हीच आहात महाराष्ट्राचे खरे आणि जाणते नेतृत्व…
आधी विचार करा, मगच कृती करा
स्वाभिमान असावा; पण गर्व नसावा
आता विरोधक पण बोलतात
अजितदादासारखा नेता अन्
राष्ट्रवादी सारखी सत्ता नाहीच…