नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून यामुळं सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी आज, ‘कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात यासाठी जनतेने आवाज उठवावा,’ असे आवाहन केले आहे.
प्रियांका यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ‘अधिकाधिक चाचण्या हा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे. चाचणी झाली तरच संसर्ग झालेल्यावर उपचार होऊ शकतो. चाचण्यांचे प्रमाण वाढवून उपचार करणे हा आपला मंत्र असावा,’ अशी भूमिका मांडली आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवरून कॉंग्रेस नेते सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसंख्येचा विचार करता भारतातील चाचण्यांचे प्रमाण जगात नीचांकी पातळीवर असल्याचा दावा देखील पक्षाकडून केला गेलाय. अशातच आता प्रियांका गांधी-वढेरा यांनी, ‘कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात यासाठी जनतेने आवाज उठवावा’ असे आवाहन करत केंद्र सरकारतर्फे कोरोनाच्या चाचण्या योग्य प्रमाणात होत नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप लगावला आहे.
कोरोना वाइरस के संक्रमण को रोकने का एकमात्र रास्ता ज्यादा से ज्यादा टेस्टिंग है। तभी हम संक्रमित व्यक्ति का ट्रीटमेंट कर सकते हैं।
ज्यादा से ज्यादा टेस्ट करो, ट्रीट करो-यही हमारा मंत्र होना चाहिए।
आप सबसे मेरी गुज़ारिश है-ज्यादा टेस्टिंग के लिए आवाज उठाइए।#TestMoreSaveIndia pic.twitter.com/r8NoZZV6Xu
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 6, 2020