कोलंबो – जागतिक क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवत पाकिस्तानच्या नावावर असलेला हा विक्रम मोडण्याची संधी आता भारतीय संघाला मिळणार आहे. भारत व श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय तसेच टी-20 मालिकेला येत्या 18 तारखेपासून प्रारंभ होत असून त्यात हा विक्रम साकारण्यात भारतीय संघ यशस्वी होणार का हे पाहणे रंजक ठरेल.
विराट कोहलीच्या नेतृत्वात प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा दुसरा संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्यात भारताने युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत भारताला विक्रमाची संधी आहे. भारताने श्रीलंकेत दोन सामने जिंकले तर क्रिकेटच्या तिनही प्रकारात श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर होईल. सध्या ही कामगिरी पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यानी श्रीलंकेला 125 सामन्यांत पराभूत केले असून भारताच्या नावावर 124 विजय जमा आहेत.
भारताने श्रीलंकेविरुद्ध 222 सामने खेळताना 124 विजय मिळवले आहेत. भारताची विजयी टक्केवारी 55.85 असून श्रीलंकेने 68 सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे तर, एक सामना टाय झाला तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.