नवी दिल्ली, दि.27 -करोना संकटाशी झुंजणाऱ्या भारताच्या दृष्टीने आणखी एक दिलासादायक घडामोड घडली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या 72 लाखांवर गेली आहे. त्यामुळे करोना संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण 90.62 टक्के इतके झाले आहे. देशातील करोना मृत्यूदरही घटत आहे. आता तो 1.50 टक्का इतका आहे.