नवी दिल्ली- देशात करोना रुग्णांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात ८७६ ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली असून देशात ओमायक्रॉन रुग्णांचा आकाडा आता ३ हजार ७ वर गेला आहे. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रसह दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, केरळ, गुजरात व तामिळनाडू या राज्यात अधिक आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ७ झाली आहे. ८७६ रुग्णांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, तर ४६५ रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. ओमायक्रॉनच्या ३ हजार ७ रुग्णांपैकी १ हजार १९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात ८७६, दिल्लीत ४६५, कर्नाटक ३३३, राजस्थान २९१, केरळ २८४, गुजरात २०४ समोर आलेत. त्यातील तामिळनाडू १२१, हरियाणा ११४, तेलंगाणा १०७, ओडिशा ६०, उत्तर प्रदेश ३१, आंध्र प्रदेश २८, बंगाल २७ तर आसाम ९, मध्य प्रदेश ९, उत्तराखंड ८ रुग्ण समोर आले आहेत.