नवी दिल्ली : जम्मू काश्मिरचे विभाजन दोन केंद्र शासित प्रदेशात करण्याच्या आणि या राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्यच्या निर्णयानंतर काश्मिरी तरूणांचा दहशतवादी गटांत सहणागी होण्याच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, नियंत्रण रेषेवरून घुसखोरीच्या प्रयत्नात मात्र फरक पडला नसल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
सुरक्षा यंत्रणांनी बनवलेल्या अंतर्गत अहवालात पाच ऑगस्ट 2019 ते 26 जानेवारी 2020 या काळात केवळ 28 युवक दहशतवादी गटात गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. एक जानेवारी 2019 ते चार ऑगस्ट 2019 या काळात 105 युवक दहशतवादाकडे वळले होते. हे सर्व युवक मुख्यत: पुलवामा, अनंतनाग, कुलगाम आणि शोपीया जिल्ह्यातील होते. त्यामुळे ही घट जवळपास 60 टक्के आहे, असे या अहवालात म्हणले आहे.
2018च्या तुलनेत 2019मध्ये दहशतवादाकडे वळण्याच्या घटनांत 35 टक्के घट झाली होती. 2019मध्ये 135 युवक दहशतावादी संघटनांकडे वळले होते. 2018 मध्ये त्यांची संख्या 199 होती.