मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या आजपासून दुप्पट होत आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी मुंबई विमानतळावरुन दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्यास परवानगी दिली.
Ministry of Civil Aviation allows Maharashtra to operate 100 flights daily. Earlier, Maharashtra was allowed only 50 flights (25 arrivals and 25 departures) daily. pic.twitter.com/BEnFr1sXfQ
— ANI (@ANI) June 15, 2020
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण विमानसेवा बंद करण्यात आली होती. पण २४ मे रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ५० विमाने ये-जा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विमानतळावर आजपासून ५० विमानांचे आगमन व ५० विमानांचे उड्डाण होईल.
मुंबईतून सध्या देशाच्या विविध पंधरा सेक्टरमध्ये देशांतर्गत हवाई प्रवास सुरू आहे. लवकरच त्यामध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. लॉकडाउन लागू होण्याआधी मुंबई एअरपोर्टवरुन दररोज सुमारे १००० विमानांची (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) वाहतूक व्हायची. तर, आता दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक होईल.