मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच मंगळवारी सकाळी पाच नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही २२५ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १, पुणे आणि बुलढाण्यात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
5 fresh Coronavirus cases (1-Mumbai, 2-Pune and 2- Buldhana) in Maharashtra; Total number of positive cases in the state rises to 225: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) March 31, 2020
सोमवारी राज्यात १७ नविन रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे सोमवार दिवसाअखेरपर्यंत हा आकडा २२० होता . या १७ नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण होता. तर सोमवारी राज्यात २ कोरोनाबाधित रुग्णाचे मृत्यू झाले होते. एकाचा मुंबईत तर दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू हा पुण्यात झाला होता.
राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही दहा आहे. तर सोमवारपर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं अशी माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली.