नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून, आज या आंदोलनाचा १३ वा दिवस आहे. आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर ठिय्या मांडून आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे.
Opposition parties are opposing the Narendra Modi govt for the sake of opposition, forgetting their own work in the past. In its 2019 poll manifesto, Congress promised to repeal APMC Act & make trade of agriculture produce including export free from all restrictions: RS Prasad https://t.co/sFOz7rUpXi
— ANI (@ANI) December 7, 2020
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी उद्या सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीत भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
APMC कायद्याला शरद पवारांचा होता पाठिंबा? ‘ते’ पत्र समोर
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट शरद पवारसह इतर राजकीय पक्षाच्या नेते घेणार आहे. या बैठकीत कृषी कायद्याबाबत चर्चा केली जाणार आहे.