नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधात भारत सरकारने जे नवीन नियम केले आहेत ते आम्हाला लागू होत नाहीत कारण आम्ही केवळ सर्च इंजिन म्हणून काम करतो अशी भूमिका गुगलने घेतली आहे. त्यांनी ही भूमिका दिल्ली उच्च न्यायालयात मांडली आहे.
एक न्यायाधिशाच्या खंडपीठाने गुगलवर देखील हे नियम लागू होत असल्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला गुगलने आव्हान दिले आहे. त्यावर कोर्टाने भारत सरकारचे मत मागवले आहे. सिंगल जज बेंचला सर्च इंजिन आणि सोशल मिडीया साईट यांच्यातील फरक न कळल्याने त्यांनी हा निकाल दिल्याचा दावा गुगलने केला आहे.
केंद्र सरकारचे नवीन नियम हे सोशल मीडिया साईटसाठीचे आहेत. त्यामुळे त्याच्याशी आमचा काही संबंध पोहचत नाही असे गुगलचे म्हणणे आहे. सिंगल बेंच जजने 20 एप्रिल रोजी एका प्रकरणात गुगलच्या संबंधात हा निर्णय दिला होता.