नवी दिल्ली, दि. 18 – देशभरात स्थलांतरित मजुरांची निर्माण झालेली परिस्थिती पाहता काही प्रमाणात रेल्वे, विमान आणि बस वाहतूक सुरू करण्याची गरज असल्याचे दिसून येते असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशामध्ये परवा रस्ते अपघातात 24 मजूरांचा मृत्यू झाला याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जायचे आहे. त्यांची मानसिक परिस्थिती आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे केवळ स्थलांतरितांना आपल्या घरी जाण्यासाठी विविध सेवांचा वापर करण्याबाबत विचार केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना झाल्या आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले