मुंबई: मागील १५ दिवसांपासून सुरु असलेले सत्ता नाट्य अद्यापही जैसे थे असल्याचे चित्र आहे. विधानसभेची मुदत संपूनही कुणीच सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. परंतु भाजपने देखील आपण सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेला आमंत्रित करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. परंतु शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आघाडीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यापार्शवभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली असून, जर जर शिवसेनेने प्रस्ताव दिला तर 12 तारखेला निर्णय सांगू. असे मलिक यांनी स्पष्ठ केले आहे.
Nawab Malik,Nationalist Congress Party: If Governor invites Shiv Sena to stake claim to form govt then we will think about our next step.Till now,we haven’t received any proposal from Shiv Sena. The final decision will be taken by Congress&NCP together as declared by Pawar Sahab. pic.twitter.com/uvpYY1YGc9
— ANI (@ANI) November 10, 2019
यावेळी बोलताना मलिक यांनी सांगितले की, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, १२ नोव्हेंबर रोजी आमदारांची बैठक होणार आहे. ही जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, यावर निश्चितपणे आमदारांच्या बैठकीत खुली चर्चा होणार आहे. यानंतर आमचा निर्णय होईल.
आता भाजापाने असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोणाला बोलावतात याकडे आमचे लक्ष आहे. जर शिवसेनेला सत्ता स्थापन करायची असेल किंवा ज्या पद्धतीने संजय राऊत सांगत आहेत की, आमचाच मुख्यमंत्री होईल. अशावेळी भाजपा त्याला पाठिंबा देणार आहे का? हे पण आता स्पष्ट होत नाही. कुठतरी शिवसेनेने भाजपाशी नातं तोडलं पाहिजे. केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी रीतसर प्रस्ताव दिल्यावर आम्ही त्याच्यावर विचार करू. एखादं सरकार स्थापन करत असताना एक दिवसात त्यावर निर्णय होत नाही.
याचबरोबर शिवसेनेअगोदर आघाडीकडूनच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मलिक म्हणाले की, असे अजिबात शक्य नाही. कारण कुठलेही तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतच नाही. त्याशिवाय नुसता दावा करणे म्हणजे वेळ घालवण्यासारखेच आहे. कुठलाही निर्णय घेण्याअगोदर आम्ही आमदारांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. पण त्या अगोदर शिवसेनाच रीतसर प्रस्ताव आल्याशिवाय पुढचा आमचा निर्णय होऊ शकत नाही