रघुनाथ पाटील यांचे राजू शेट्टी यांच्यावर शरसंधान
कोल्हापूर – नाव स्वाभिमानी आणि धंदे मात्र बेईमानीचे. शासनाला हाताशी धरून शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांना लुटले असा सणसणीत टोला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज माजी खासदार राजू शेट्टी आणि नामदार सदाभाऊ खोत यांना लगावला. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे यासंबंधी माहिती देण्यासाठी रघुनाथदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली गेल्या वीस वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या या देशात वाढल्या आहेत. मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने कोणतेही धोरण शेतकरी निश्चित झालेलं नाही याच बरोबर साखर कारखानदारांनी यंदाची एफ आर पी ची किंमत बुडवले आहेत.
या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी पंढरपुरात तीन सप्टेंबर रोजी शेतकरी परिषद होत आहे. असं देखील रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केलं हे सांगत असताना पाटील यांनी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. कडकनाथ अंडी आणि कोंबडी घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 325 एकर शेती घेतली आहे. तर दुसर्या बाजूला कडकनाथ कोंबडी अंडी घोटाळा प्रकरणातून नामदार सदाभाऊ खोत यांच्या जवळच्या नातेवाईकांना शेतकऱ्यांना लोकांना हे एकूणच शासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांचे नेते शेतकर्यांना लुबाडतात त्यांच्या संघटनांचे नाव स्वाभिमानी असल् तरी धंदे मात्र बेईमानी चे आहेत आहे असा स्पष्ट आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केलाय.
रघुनाथ पाटील (शेतकरी नेते)
आगामी विधानसभा निवडणुका शेतकरी संघटना समविचारी पक्षांना एकत्र येऊन लढणार आहे असेही रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या महापुरात शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालं नाही तेवढे नुकसान शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांचा केला आहे. असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले यावेळी म्हणाले.
बेईमानी