मुंबई : केंद्र सरकारनं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्यांनतर कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे. “एनआयएमार्फत तपास करायचा होता तर आधीच करायचा होता. “राज्य सरकारनं काही भूमिका घेतली त्यानंतर केंद्रानं आपली भूमिका बदलली,” असा टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला.
केंद्र सरकार राज्य सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वळसे-पाटील यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील केंद्र मोदी सरकारला फटकारले आहे. मोदी सरकार कोणालातरी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हंटले आहे.