नवी दिल्ली – अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर आणि मालमत्तांवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. यावरून राजकीय पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी म्हणींमधून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. उँगलियों पर नचाना- केंद्र सरकार आयटी विभाग, ईडी आणि सीबीआय सोबत हे करत आहे. भीगी बिल्ली बनना- केंद्र सरकारचे मित्र मीडिया. खिसियानी बिल्ली खंबा नोचे- जसे केंद्र सरकार शेतकरी समर्थकांवर छापे टाकण्यास सांगते, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
कुछ मुहावरे:
उँगलियों पर नचाना- केंद्र सरकार IT Dept-ED-CBI के साथ ये करती है।
भीगी बिल्ली बनना- केंद्र सरकार के सामने मित्र मीडिया।
खिसियानी बिल्ली खंबा नोचे- जैसे केंद्र सरकार किसान-समर्थकों पर रेड कराती है।#ModiRaidsProFarmers
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 4, 2021
दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नु यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले. पुणे आणि मुंबईत त्यांच्याशी संबंधीत एकूण 20 ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले आहेत. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नु यांनी मोदी सरकारवर विविध विषयांच्या अनुषंगाने आत्तापर्यंत अनेक वेळा टीका केली होती. अनेक राष्ट्रीय विषयावर ते दोघेही सतत टिपण्णी करीत आले आहेत. त्यात सरकारचाच विरोध अनेक वेळा दिसून आला आहे.