मुंबई – दोन वर्षांच्या अवधीनंतर मंत्रालय आता सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. कोविड-19 साथीच्या आजाराच्या उद्रेकानंतर मंत्रालयातील प्रवेश सर्वसामान्यांना बंद करण्यात आला होता.
सरकारी परिपत्रकात म्हटले आहे की, सामान्य लोकांना दुपारी 2 नंतर सरकारी मुख्यालयात प्रवेश मिळू शकेल. मार्च 2020 मध्ये, साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर, लॉकडाऊन करण्यात आले आणि मंत्रालयाचा परिसर सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील कोविडच्या केसेस नियंत्रणात आल्यानंतर राज्यातील कोविड निर्बंध बऱ्याच अंशी मागे घेण्यात आले आहेत. परंतु मंत्रालयातील सामान्य लोकांचा प्रवेश मात्र अजून खुला करण्यात आला नव्हता. पण आता मात्र आज पासून मुंबईतील मंत्रालय पुर्वीसारखे लोकांमुळे गजबजणार आहे.