अमरावती : दर्यापूर तहसील कार्यालयाला राज्य मंत्री बच्चू कडू यांनी आज अचानक भेट दिली. त्यांनी नायब तहसीलदार जयंत डोळे, नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर निलंबन कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे अधिकाऱयांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जर सेवा कायद्याचं पालन केले नाही तर सामना माझ्याशी आहे असं सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
एक वर्षांपासून अंत्योदय कार्ड मिळत नाही अशी तक्रार एका शेतकऱ्याने त्यांच्याकडे केली. त्यांनी तहसीलदारांना विचारले असता सदरील फाईलवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले. 7 दिवसापेक्षा जास्त कोणतीही फाईल कार्यालयात ठेवता येत नाही. म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.