नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये रविवारी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पनूने ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे
And between all the heart breaking visuals and news coming in…. something that closes a loop for good. https://t.co/ddI6JaUVt4
— taapsee pannu (@taapsee) December 16, 2019
तापसीने ट्विट केले की,’नवीन नियम बनवले जात आहेत आणि या नियमांत न बसणाऱ्यांना आता परिणाम भोगावे लागतील असं चित्र दिसतंय, असं तिने ट्विटरवर म्हटलंय. तिने पुढे लिहिले आहे,’ही सुरुवात आहे की शेवट हे कळत नाहीये. हे जे काही असेल, पण आता नवीन नियम बनवले जात आहेत. या नियमांत न बसणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. हा व्हिडीओ पाहून मन तुटतो आणि आशाही संपते. भरून न निघणारं नुकसान आणि हे मी केवळ जीवितहानी किंवा वित्तहानीविषयी बोलत नाहीये.’ तापसीसोबतच इतरही बॉलिवूड कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला आहे