कोलकाता – पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी लोकसभा निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्ववभूमीवर राज्यातील चार प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला तृणमूल काँग्रेसतर्फे पार्थो चॅटर्जी, भाजपतर्फे दिलीप घोष, सीपीआयएमतर्फे एसके मिश्रा आणि काँग्रेसतर्फे एसएन मित्रा हे राज्यपालांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत.
तत्पूर्वी, पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीची माहिती दिली होती. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचार उफाळून आला असून त्यात आत्तापर्यंत बारा जणांचे बळी गेले आहेत. मात्र या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना या बैठकीचा तपशील आपल्याला जाहीर करता येणार नाही असे सांगत या बैठकीबाबत गुप्तता राखली होती.
अशातच आता राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींची बैठक आयोजित केली असल्याने, या बैठकीमध्ये तरी हिंसाचाराच्या प्रश्नावर तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
West Bengal Governor Keshari Nath Tripathi to convene a meeting of 4 major political parties in context of reported post-poll violence in the state, tomorrow at the Rajbhavan. Partho Chatterjee (TMC), Dilip Ghosh(BJP), SK Mishra (CPIM) & SN Mitra (Congress) to attend the meeting. pic.twitter.com/6GKMTD0OPA
— ANI (@ANI) June 12, 2019