आमदार संग्राम थोपटे : वीसगाव खोऱ्यात महाआघाडीकरून जोरदार प्रचार
भोर- भोर-वेल्हे-मुळशी तालुक्यांत कोट्यवधींची विकासकामे आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसच्या माध्यमातून झाली आहेत. परंतु विरोधक विकासाचे नाव बाजूला ठेऊन जाती – पातीचे राजकारण करुन अपप्रचार करुन मतदारांना भडकविण्याचे काम करतात. मात्र, माझी मावळी जनता सुज्ज्ञ असल्यामुळे येणाऱ्या सोमवारी (दि. 21) मतदानाच्या स्वरुपात मते देऊन विरोधकांना त्यांची जागा दावून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.
भोर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ वीसगातव खोऱ्यातील बाजारवाडी येथील गावाभेट प्रचार दौऱ्यात मतदारांशी त्यांनी संवाद साधला. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यापासून एकनिष्ठ असलेल्या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात चिखलावडे, आंबेघर, पोंबडी, शिरवली, भोर, वेनवडी, वडगाव डाळ, उत्रौली, भाबवडी, खानापूर, हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळशोसी, पाले, वरोडी खुर्द, वरोडी डायमुख, वरवडी बुद्रुक, आंबाडे, बालवडी, नेरे, गोकवडी या भागात गावभेट प्रचार दौरा केला. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, उत्तम थोपटे, विठ्ठल कुडले, दिनकर कुडले, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे, भाऊ तारु, संपत दरेकर, तुषार शिंदे, प्रमोद थोपटे, हनुमंत चव्हाण, राजू शिंदे, विकास शिंदे, मारुती चव्हाण, अशोक फाटक, नवनाथ मानकर, आप्पा गोळे, अंकुश सावले, अनिल सावले, विकास शिंदे, बाळकृष्ण शिंदे, अर्जुन शिंदे, बापूसहेब गाडे, धनंजय पोळ आदिंसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, विरोधकांना तालुक्याच्या विकासकामांचे देणे-घेणे नसून गावागावांत वाद लावण्याची कामे करीत आहेत. जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. शंकर महाराज शिंदे म्हणाले की, आमदार संग्राम थोपटे हे तरुणांचे आशा स्थान असल्याने बाजारवाडी परिसरातील जनता त्यांच्या पाठमागे खंबीरपणे उभी राहून भरभरून मताधिक्याने येत्या विधानसभा निवडणुकीत निवडून देणार आहे, असा विश्वास शंकर महाराज शिंदे यांनी व्यक्त केला.
- युतीकडून रिझर्व बॅंकेची तिजोरी रिकामी
या निवडणुकीतील उमेदवारच म्हणतोय आमचा मारामिरी करण्याचा धंदा आहे. छत्रपतींचे नाव घेवून हे आज मते मागत आहेत आहेत; मात्र आरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक उभारणी करण्याची घोषणा केलेल्या या युती सकारणे एकही विट बसवलेली नाही. शेतकऱ्यांना फसव्या कर्जमाफीचे अमिष दाखवून शेतकरी, व्यापारी, या साऱ्यांचीच फसवणूक केली आहे. राज्यातील उद्योगधंगे बंद पडण्याच्या मार्गावार आहेत. देशाची अर्थव्यवस्था या सरकारने बिघडवली असून 70 वर्षांत रिझर्व बॅंकेची तिजोरी रिकामा करण्याचे धाडस केले असल्याचे नमूद करुन सत्ताधारी युती सरकारचे वाभाडे आमदार संग्राम थोपटे यांनी काढले.