नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शुल्कवाढविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांवर काही बुरखाधारी गुडांच्या टोळीने हल्ला चढवला. लाठी – काठीने त्यांना बेदम मारहाण केली. हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न असून यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जबाबदार असल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंटस असोसिएशनने केला आहे.
रविारी या हल्ल्याची घटना घडली. सर्व हल्लेखोरांनी तोंड पुर्णपणे झाकून घेतले होते. त्यांनी सायंकाळी सातच्या सुमारास विद्यापीठाच्या आवारत प्रवेश केला. त्यांनी लाठया काठ्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यामुळे आंदोलक विद्यार्थी घाबरले. त्यांनी विद्यापीटाच्या आवाराचा आसरा घेतला.
एआयएसएने या हल्ल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दोषी ठरवले आहे. शुल्कवाढीला विरोध करत असल्याने अभाविपने हा हल्ला घडवल्याच आरोप निवेदनाद्वारे केला आहे.