नवी दिल्ली -भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या वाहनांच्या दरात 689 रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. 1 एप्रिलपासून अधिक सुरक्षित नोंदणी प्लेट्स बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या कारणामुळे कंपनीने ही वाढ केली आहे.
शेअरबाजाराला दिलेल्या माहितीत या कंपनीने सांगितले की, हे नवे दर एक एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सर्व वाहन कंपन्यांना अधिक सुरक्षित असलेल्या नोंदणी प्लेट्स एक एप्रिलपासून बंधनकारक केल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली. त्यामुळे वाढीव खर्च भरून निघणार आहे.