मुंबई – सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल, महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी हा इशारा दिला आहे.
View this post on Instagram
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणा कोलमडून गेली. त्यातच, तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिलाय. कोव्हिड-19 ने देशभरात हा:हाकार माजवलाय. ही लाट नाही, त्सुनामी आहे. या शब्दात डॉक्टर परिस्थितीचं वर्णन करतायत. देशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गाने विक्राळ रूप धारण केलंय.
View this post on Instagram
यामुळे सध्या चित्रपटांचे शुटिंगही बंद ठेवण्यात आले आहे. याच संदर्भात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
View this post on Instagram
रिंकू राजगुरूने सांगितले आहे की,’सध्या खूप भयंकर परिस्थिती आहे. काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो. ज्याला आपण परवा भेटलो आहे आणि अचानक रात्री फोन येतो की तो आपल्यात राहिला नाही. हे खूप भयानक आणि भीतीदायक आहे. जेव्हा माणून या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हाच त्याला कळतं. काही लोक कोरोना वगैरे काही नसतं, मास्क लावणार नाही, असे म्हणत आहे. लोकांना इतकेच सांगायचे आहे की असे बेजाबदार वागू नका.