मुंबई : भाजपाच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल असं भाकित केलं होते. तसेच, भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करताना दिसत आहेत. त्यातच अजित पवार यांनीदेखील याबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
“अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपामध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. ज्यांना शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही. ते आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करत आहेत,” असे निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली.
अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 18, 2020
भाजपाचे जे आमदार राष्ट्रवादीमध्ये येतील, त्यांना पोटनिवडणुकीत जिंकवण्यासाठी तीन पक्ष मिळून एकच उमेदवार देऊ आणि भाजपाचा पराभव करू, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.