नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारताचे राजदूत आणि दूतावासातील सुमारे 120 कर्मचाऱ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यात आले आहे. लष्कराच्या मालवाहू सी-17 विमानातून त्यांना मायदेशी आणण्यात आले आहे.
मात्र परत येण्यापूर्वी विमानतळावर भयानक अनुभवाबद्दल पत्रकार नयनिमा यांनी ‘दी प्रिंट’मध्ये लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी प्रत्येक मिनिटांच्या अनुभव शेअर केला आहे. या लेखात त्या लिहितात की,’जेव्हा १५ ऑगस्टला तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवला त्यावेळी अनेक अफगाणी लोकांमध्ये मी सुद्धा तेथे उपस्थित होते.
यानंतर १६ तारखेला मी भारतात परत येणार होते त्यावेळी मला अनेक परिस्थितीचा सामना करावा लागला. १६ ला मी ११ वाजता भारतामध्ये निघण्यासाठी मी काबूल विमानतळावर पोहोचली त्यावेळ तिथे पहिलेच तालिबानने उपस्थित होते त्यांनी विमानतळ ताब्यात घेतलं होत.
त्या पुढे लिहितात कि,’माझ्या मते ऐकून 8-10 सशस्त्र वाहनांनी तालिबान्यांनी काबुल विमान तळ अडकवलं होत. प्रवाशांना विमानतळाच्या मुख्य टर्मिनस इमारतीच्या बाहेर रस्त्यावर बसायला लावून तालिबान्यांकडून हवेत गोळीबार केला जात होता. गर्दी वाढल्यावर तालिबान्यांनी आपल्या गोळीबारातही वाढ केली. यावेळी माझ्या शेजारी उभ्या एक व्यक्तीला गोळी लागली . यांनतर त्या तिथल्या भारतीय दूतावासात जावं. भारतीय दूतावासात जाते वेळी अनेकदा आम्हाला तालिबान्यांनी अडवलं यावेळी त्यांची समजून काढत त्या दूतावास पर्यंत पोहचल्या. तेथून त्यांना पुन्हा सुरक्षित विमानतळावर नेण्यात आले.
दरम्यान, काही तासानंतर त्या भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर या विमानात प्रवेश केला. काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टेक्निकल एरियामध्ये ते विमान पार्क केलेलं होतं. तेथे अमेरिकेचं सैन्य तैनात करण्यात आलेलं होतं. अखेरीस त्या विमानाने उड्डाण केलं त्या भारतात पोहचल्या.