मुंबई : राज्यातील सत्तानाट्याचा संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले असताना उद्याच 30 जून रोजी बहुमत सिद्ध करा असे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. त्यांच्या निर्देशाला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक आणि माजीमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
तुरुंगात असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी बहुमत चाचणीच्या वेळी मतदान करु द्यावं, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याच्या बाजूने कौल दिल्यास आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मताची महाविकास आघाडीला गरज भासणार आहे. हे दोन्ही आमदार सध्या वेगवेगळ्या गुन्ह्याखाली तुरूंगात आहेत. त्यामुळे या दोघांनी बहुमत चाचणीत मतदानासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.