नवी दिल्ली- प्रदीर्घ लॉक डाऊन मुळे व्यापारी वर्गाची परिस्थिती बिघडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व्यापाऱ्यांना सरकार बरोबर सहकार्य करून प्रयत्न करावे लागणार आहेत.
या परिस्थितीचा व्यापारावर इतका परिणाम झाला आहे की आगामी काही महिने व्यापाऱ्यांना यातून बाहेर पडणे अवघड जाणार असल्याचे कोरफडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेने म्हटले आहे की यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाला एक निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने व्यापाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार त्यांच्या कर्मचाऱ्यांना द्यावा असे सुचविले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये बहुतांश व्यापाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देणे अवघड जाणार आहे. जर व्यापाऱ्यानी ओढून-ताणून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार दिला तर देशातील बहुसंख्य व्यापाऱ्याचे काम कोलमडेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे सीएआयटीने वाणिज्य मंत्रालयाच्या लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
व्यापारी कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार देऊ शकणार नाहीत. मात्र काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकतील. केंद्रसरकारने कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही प्रमाणात भाऊ उचलण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारबरोबर व्यापारी संघटना चर्चेसाठी तयार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.