दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पक्षाचा निर्णय
नवी दिल्ली : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. त्यातच आता कॉंग्रेसने यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी दिल्लीत नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात कॉंग्रेसची पहिली यादी 5 सप्टेंबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. कॉंग्रेसच्या छाणनी समितीची दिल्लीत बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेतला. दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जागांवर वाद आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक उमेदवारासंदर्भात कॉंग्रेसच्या छाणनी समितीची बैठक दिल्लीत झाली. कॉंग्रेसची पहिली यादी 5 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. तीन तासांहुन अधिक वेळ झाली, अशी माहिती मिळाली. आता आंबेडकर म्हणतात, मला मुख्यमंत्री घोषित करा. कडूनिंबाच्या पाल्यात साखर घातली तरी गोड होत नाही. आंबेडकर यांच्या मनांत काय कडू आहे माहीत नाही, भाजपला मदत होईल असे आंबेडकर वागत आहेत. त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलली. त्यांचा अल्टिमेटम आम्ही मानत नाही, असे वडेट्टीवार म्हणालेत. दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागा वाटपाची चर्चा सध्या दहा वादग्रस्त जागांवर अडकली आहे. या दहा जागांवर दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने दोन्ही पक्षातील चर्चा पुढे सरकताना दिसत नाही. 288 पैकी 212 जागांचे वाटप दोन्ही पक्षात पूर्ण झाले आहे. यातील 106 जागा कॉंग्रेस आणि 106 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.