अंमळनेर – राज्यातील तिन्ही सत्तारूढ पक्षांकडून राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नावे निश्चीत करण्यात आली असून त्याला मंत्रिमंडळाची मंजुरीही घेण्यात आली आहे.
त्याची यादी मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार असून राज्यपाल त्याला तातडीने मंजुरी देतील अशी महिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले की, ही नावे केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाच माहिती आहेत. ती लवकरच जाहीर होतील असे ते म्हणाले.
भाजपला सध्या मोठी गळती लागली असून ती गळती रोखण्यासाठीच भाजपकडून सरकार पडण्याची आवई उठवली जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या दाव्यात अजिबात तथ्य नसून ही केवळ भाजप वाचवण्याचीच केविलवाणी धडपड आहे असे ते म्हणाले.