पुणे : पोलीस अधिकारी परमबीरसिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील पोलीस दलात खळबळ माजली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस दलातील टार्गेटची चर्चा सुरु झाली आहे. ही संधी साधत पुण्यातील पोलीस आयुक्तांवरच एक लेटर बॉम्ब टाकण्यात आला होता. मात्र हा बॉम्ब वाजलाच नाही. या बॉम्बची कल्पना अगोदरच आल्यावर त्याची वात पध्दतशीरपणे (स्टॅप पेपरवर) काढण्यात आली होती.
राज्यात सध्या परमबीरसिंग यांच्या लेटर बॉम्बचीच चर्चा आहे. आजवर जे सत्य उघडपणे सांगितले जात नव्हते, ते चव्हाट्यावर आणण्याचे काम परमबिरसिंग यांनी केले आहे. यामुळे हा लेटर बॉम्बमध्ये खाकी वर्दीतील व्यक्तींसाठी नवीन असे काहीच नव्हते. मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. यामुळे राजकारण ढवळून निघाले असून सत्तेसाठी राजकीय पक्षांची रस्सीखेस सुरु आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक टार्गेटचा आकडा बघुन अवाक झाले आहेत.
आता पुणे शहराच्या नाक्कया नाक्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांना इतके टार्गेट तर पुणे पोलीस आयुक्तांना किती टार्गेट असेल ? याच्या खमंग चर्चा सुरु आहेत. या खाकी आणी खादीच्या वादात “पुणे पोलीस आयुक्तांवरही एक लेटर बॉम्ब’ टाकून खळबळ माजवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला . मात्र या बॉम्बच्या विश्वहार्ततेवर शंका असल्याने तो कोणीच वाजवला नाही. तर अगोदरच सावध असलेल्या पुणे पोलीस दलातील चाणाक्ष अधिकाऱ्यांनी बॉंम्बची वात पध्दतशीरपणे काढून घेतली होती.
-वसुली वालोंके भी वसुल होते हे
बॉम्ब फुटला नसला तरी तो ज्यांच्या हाती लागला त्यांनी त्याला काहीशी हवा देण्याचा प्रयत्न केला. बॉम्ब फोडण्याची भिती दाखवत वसूलीवाल्यांकडूनच वसुली करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र वसुली वालों के भी वसूल होते हे,असे म्हणतातच ना ? यामुळे गरज असताना सढळ हाताने घेणारे अडचणीत आल्यावर कसा त्रास देतात याचा अनुभवही वसुलीवाल्यांना आला.