तिरुवनंतपुरम : नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा, अशी मागणी करणारा ठराव केरळ विधानसभेने संमत केला. केरळ विधानसभेत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या भाषणा आगोदर नागरिकत्व कायदा आणि एनआरसीमुळे गदारोळ झाला. यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ)च्या आमदारांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सभागृहाचा त्याग केला.
केरळ विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी सुरू झाले. राज्यपाल अभिभाषणासाठी सभागृहात पोहोचल्यावर युडीएफच्या आमदारांनी त्यांचा मार्ग अडविला. राज्यपालांच्या समवेत केरळचे मुख्यमंत्री हि उपस्थित होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला (कॉंग्रेस) म्हणाले की, राज्यपाल हे आरएसएसच्या आदेशानुसार भाजप प्रदेशाध्यक्षांसारखे वागत आहेत. सत्ताधारी माकप आणि राज्यपालांचे पडद्यामागे हितसंबंध आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री सामील आहेत, म्हणूनच मुख्यमंत्री केंद्र सरकारला पाठिंबा देत आहेत.